Wednesday, September 30, 2009

पिकली पानं नाही, पिकली फळं


वृद्ध माणसांना पिकलं पान म्हणतात. मला वाटत की, आपण त्यांना पिकलं फळ का नाही म्हणत?

आपल्या पाठीशी कुणाचे तरी आशीर्वाद आहेत, ही भावना जितकी आत्मविश्वास देणारी आहे तितकीच आपल्या आशीर्वादाची कुणालातरी कदर आहे ही भावना सुखावणारी आहे. आई जेव्हा आजीला विचारते, 'हे करंजीचं सारण झालं की, अजून थोडं होऊ देऊ? तेंव्हा उत्तर देतांना आजीच्या चेहरा व त्यावरचं समाधान बघण्यासारखं व अवर्णनीय असतं.
आपल्या अनुभवांची शिदोरी पुढच्या पिढीला उपयोगी पड़ते आहे ही भावना खरच समाधानी देणारी असणार आहे…

मागच्या आणि पुढच्या पिढीतली मतांतरे, घर्षण अटल आहे. पण दोन गोष्टी एकमेकांना धरून राहण्यासाठी फ्रिक्शन आवश्यक असते तसं…


No comments:

Post a Comment